ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी ८ तास बंद

ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी ८ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम महामंडळानं हाती घेतलं आहे. हे काम शुक्रवारी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते संध्याकाळी ८ या वेळेत केलं जाणार आहे. यामुळे मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती तसंच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग, कोलशेत आणि वागळे इस्टेट मधील काही भागाचा पाणी पुरवठा ८ तासासाठी बंद राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading