ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज रात्री १२ वाजल्यापासून २४ तास बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जांभूळ (बारवी) जलशुध्दीकरण येथील जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे आज रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार म्हणजे उद्या रात्री १२ पर्यंत २४ तास शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये कळवा , खारेगाव , पारसिक नगर, आतकोनेश्वरनगर , घोलाई नगर , रेतीबंदर , विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर , रुपादेवीपाडा , वागळे फायर ब्रिगेड तसेच बाळकुम पाडा नं .१ या ठिकाणी एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा २४ तास पुर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.