ठाणे शहराला पाणी पुरवठा करणार्या पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे . या कारणांमुळे शहरामध्ये पुढील चार दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.
तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.