ठाणे जिल्ह्यात काल १ हजार ५६१ नवे कोरोना बाधित रूग्ण सापडले त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ३१ हजार ८५० झाली आहे. काल दिवसभरात ३४ जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या १ हजार २० झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्गात होत असलेल्या वाढीमुळे प्रशासन हतबल झाल्याचं दिसून येत आहे. काल कल्याणमध्ये ४३५, ठाणे ३३८, नवी मुंबईत २२७, भिवंडी ११९, मीरा-भाईंदर १२४, उल्हासनगर १३७, अंबरनाथ ८८, बदलापूर २१ तर ठाणे ग्रामीण क्षेत्रात ७२ नवीन रूग्णांची नोंद झाली.