साखर आयुक्तालयातील उपसंचालक सुनिल जाधव यांची ठाणे जिल्हा नियोजन अधिकारीपदी नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच आपला पदभार स्विकारला. जिल्हा विकासाला चालना देतानाच ग्रामीण सुविधांचे बळकटीकरण आणि ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न राहील असे नवनियुक्त जिल्हा नियोजन अधिकारी जाधव यांनी सांगितले. ठाणे येथे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी जाधव यांनी रायगड येथे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ते पुणे येथील साखर आयुक्तालयामध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. 2003 मध्ये ठाणे जिल्हा मानव विकास अधिकारी म्हणून त्यांची पहिल्यांदा नियुक्ती झाली. त्यापूर्वी त्यांनी 1993 ते 1998 या काळात राज्याच्या आरोग्य विभागात सांख्यिकी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. जिल्ह्यातील पाणी, वीज, कृषि विषयक क्षेत्राच्या विकासासाठी भरीव प्रयत्न करण्यात येतील. तसेच ग्रामीण क्षेत्रातील मुलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी त्याच बरोबर ग्रामीण पर्यटनला चालना देतानाच त्या भागातील नागरिकांच्या आर्थिक उन्नती करीता प्रयत्न केले जातील असे सुनिल जाधव यांनी सांगितले.