जिल्ह्यात कोरोनाचे ३० नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात १०१ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८९४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ८ रूग्ण आढळले. सध्या ४० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १२७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या ५ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५४ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २० नवे रूग्ण तर ५२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ० रूग्ण, सध्या १ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० रूग्ण तर सध्या १ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या ० रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर ० रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ रूग्ण आढळले. सध्या २ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.