जिल्ह्यात कोरोनाचे १६१ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही.
सध्या जिल्ह्यात १ हजार ४१४ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९१९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ५८ रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या ५६४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १४० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २१ रूग्ण, सध्या १६४ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५७ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५० नवे रूग्ण आढळले. सध्या ४२९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५२ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १० रूग्ण आढळले. सध्या ८७ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ८ रूग्ण तर सध्या ५५ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६६० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ रूग्ण, सध्या १७ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ४ रूग्ण तर ३४ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ७ रूग्ण, सध्या ६४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.