जिल्ह्यात कोरोनाचे १५ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १५ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात २४१ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८७८ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १० नवे रूग्ण आढळले. तर ० मृत्यू, सध्या ९३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १२७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २ नवे रूग्ण तर ० मृत्यू, सध्या ९ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५० रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २ नवे रूग्ण ० मृत्यू तर ९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ८ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ७ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू, सध्या ११ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या २ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५७९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू तर २ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८८ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये १ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ११ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading