ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४३१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ हजार ७५१ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ६८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख १५ हजार ६४४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २९ हजार १९ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ७६५ रूग्ण उपचार घेत असून ४८ हजार ३७८ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २३५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ७०४ रूग्ण उपचार घेत असून ५१ हजार २७६ बरे झाले तर १ हजार ६० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ६०५ रूग्ण असून ४५ हजार ६६२ बरे झाले तर ९८४ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ५८७ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ८३७ कोरोनातून बरे झाले तर ७५६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २८६ रूग्ण असून १० हजार २०३ बरे झाले तर ३५३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ११९ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ८१६ कोरोनातून बरे झाले तर ३४५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १७६ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ४०४ बरे झाले तर २८९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २०१ रूग्ण असून ७ हजार ७६५ कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ३०८ रूग्ण असून १६ हजार ३०३ बरे झाले तर ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.