जिल्ह्यात आज कोरोनाचे ४१७ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४१७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ हजार ६४ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३ हजार ९९१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख १६ हजार ५२० पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ५११ रूग्ण उपचार घेत असून ४५ हजार ३७२ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार १७६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार २३६ रूग्ण उपचार घेत असून ४८ हजार ८५८ बरे झाले तर १ हजार १८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ३०५ रूग्ण असून ४३ हजार ३३७ बरे झाले तर ९२५ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ८११ रूग्ण उपचार घेत असून २१ हजार ५७३ कोरोनातून बरे झाले तर ७३९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३९२ रूग्ण असून ९ हजार ६५६ बरे झाले तर ३४६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २१० रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ४९४ कोरोनातून बरे झाले तर ३३७ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १४१ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ६ हजार ९९८ बरे झाले तर २७५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १८० रूग्ण असून ७ हजार २५० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २७८ रूग्ण असून १५ हजार ४१३ बरे झाले तर ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading