जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५७ नवे रूग्ण – भिवंडीत आज एकही नवा रूग्ण नाही

जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ७० नवे रूग्ण सापडले तर २ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ९९ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ७८ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३४४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ८ नवे रूग्ण, २ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५४३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४६६ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये २३ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५२३ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज २४ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २०० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading