जिल्ह्यात आज कोरोनाचे ३४७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ६४ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ६१ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ८० नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ८१ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८१० जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ४९ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३४९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १५ नवे रूग्ण, ४ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५५९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४६८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ३० नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत ५२८ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ७ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ३५२ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १९ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २०४ जणांचा मृत्यू झाला आहे.