जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २१२ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २१२ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार ४६१ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ३ हजार ५५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ८ हजार १६६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख २४ हजार १७७ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ७४५ रूग्ण उपचार घेत असून २३ हजार ३२५ कोरोना रूग्ण बरे झाले तर ८३९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार १३४ रूग्ण उपचार घेत असून २५ हजार २५१ बरे झाले तर ६३० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४५३ रूग्ण असून २२ हजार १०८ बरे झाले तर ५८८ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ४३३ रूग्ण उपचार घेत असून १० हजार ७५२ कोरोनातून बरे झाले तर ४२१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ४३३ रूग्ण असून ७ हजार १४६ बरे झाले तर २२६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १२६ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ७७७ कोरोनातून बरे झाले तर २८४ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ३१८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ४ हजार ४५५ बरे झाले तर १८६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २९६ रूग्ण असून ३ हजार ७६५ कोरोनामुक्त झाले तर ७१ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ५२३ रूग्ण असून ७ हजार ५८७ बरे झाले तर ३०५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading