जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही. सध्या जिल्ह्यात ११ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज एकही रूग्ण नाही. सध्या ४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या १ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६२ रूग्ण दगावले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज एकही रूग्ण नाही. सध्या २ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या एकही रूग्ण उपचार घेत नसून आत्तापर्यंत १ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० रूग्ण, सध्या एका रूग्णावर उपचार सुरू असून आत्तापर्यंत ६६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या १ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज एकही रूग्ण नाही. सध्या एका रूग्णावर उपचार सुरू असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ० रूग्ण, सध्या १ रूग्ण उपचार घेत आहे. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.