कल्याणमधील पत्रकार आशिष पाठक यांचं दु:खद निधन

कल्याणमधील एक पत्रकार आशिष पाठक यांचं आज दु:खद निधन झालं. आशिष पाठक हे महाराष्ट्र टाईम्स मध्ये पत्रकारिता करत होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरूवात ठाणे वार्तापासून केली. दूरदर्शनवरही सकाळच्या बातम्यांसाठी ते काम करत असत. काही वर्षांपूर्वी ते मोठ्या आजारातून गेले होते. त्यातून बरे झाल्यावर त्यांनी पुन्हा आपलं काम सुरू केलं होतं. त्यांचा आजार बरा झाला असं वाटत असतानाच हा आजार बळावला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याणमध्ये आज त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. ठाणे वार्ता परिवारातर्फेही त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading