महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा

महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून यानिमित्तानं लोकशाही बळकट करण्याचा निर्धार प्रशासन आणि पदाधिका-यांनी केला. राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून नागरिकांनी निवडणूक कार्यक्रमात सहभागी व्हावे असं आवाहन महापौरांनी यावेळी केलं. आजपासून लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून यानिमित्तानं पालिका क्षेत्रात विविध प्रसारमाध्यमांच्या द्वारे लोकशाही, निवडणूक आणि सुशासन याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. भारतीय राज्य घटनेत वेळोवेळी दुरूस्ती करून लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ७३ आणि ७४वी घटना दुरूस्ती लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जाते. येणा-या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावं तसंच ज्या युवकांचं नाव मतदान यादीत समाविष्ट नाही त्यांनी तात्काळ आपले नाव नोंद करून लोकशाही बळकट करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading