मुंबईच्या वेधशाळेने तीन दिवस टाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची
शक्यता व्यक्त केली आहे. जून संपायला आला तरी पाऊस सध्या न आल्यामुळे सर्वांचे
पावसाकडे डोळे लागले आहेत. यापूर्वी अनेकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला
होता. पण पावसाने मात्र हजेरी लावलेली नाही. आज, उद्या आणि शनिवारी असे तीन
दिवस ठाणे, पालघर, रायगड अशा तीन जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा
अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.