आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते. घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. यावेळी नैवेद्यासाठी कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे केले जातात. दूध-तूप घालून गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरात कुठेतरी अडगळीत पडलेले दिवे बाहेर काढून स्वच्छ धुवून
लख्ख केले जातात. पाटाच्या भोवती रांगोळी काढून त्यावर वस्त्र ठेवून दिव्यांची पूजा केली जाते. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा असं या दिव्याचं प्रतिक आहे. आपल्या जीवनातलं अंधारमय दु:ख जाऊन प्रकाशमय असा आनंद आपल्याला मिळो अशी यामागची संकल्पना असून त्यासाठी आजच्या अमावास्येला दिव्यांची पूजा करण्याची पध्दत आहे. पण
गेल्या काही वर्षात या अमावास्येला गटारी अमावास्या ठरवून सर्वत्र मांसाहार आणि मद्यसेवन करण्याची प्रथा पडली आहे. आषाढी अमावास्येनंतर श्रावण सुरू होतो.
त्यामुळं नंतर गौरी-गणपतीपर्यंत घरोघरी मांसाहार होत नसल्यामुळं या अमावास्येला गटारी अमावास्या असंच नाव रूढ जालं आहे.