विनाकारण रस्त्यावरून फिरणा-यांविरोधात कारवाई करून ठाणे पोलीसांनी ७ हजार २८१ वाहनं जप्त करून ४७ लाख २५ हजार इतका दंड वसूल केला आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडू नका असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार होत असताना काही व्यक्ती या आवाहनाला न जुमानता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचं दिसून येत आहे. अशाच विनाकारण रस्त्यावरून फिरणा-या टू व्हीलर आणि फोर व्हीलरवर कारवाई करून पोलीसांनी आत्तापर्यंत लाखोंचा दंड वसूल केला असून घरी थांबा आणि पोलीसांना सहकार्य करा असं कळकळीचं आवाहन पोलीसांनी पुन्हा एकदा केलं आहे.