राज्यात वाढत असलेल्या बेरोजगारीच्या विरोधात आम आदमी पार्टी ठाणे जिल्हा युवा आघाडी च्या वतीने रोजगार दो आंदोलन करण्यात आले. महत्वाचे मोठे मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर जात आहेत, त्यामुळे स्थानिक लाखो युवांच्या तोंडाचा घास हे सरकार पळवत आहे . रोजगार नसल्यामुळे युवक वर्ग आत्महत्या करत आहे, वाम मार्ग स्वीकारत आहे, ह्याला जबाबदार कोण ? स्थानिकाना रोजगार नाही ह्याला जबाबदार कोण ? कंत्राटी पद्धतीमुळे योग्य तो पगार मिळत नाही पक्क्या नोकरीचि हामी नाही ह्याला जबाबदार कोण ? असे प्रश्न विचारण्यात आले. आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने रोजगाराच्या सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्या आहे तसेच उद्योग सुरु करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर हे महाराष्ट्रामधे का होऊ शकत नाही. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठपुरावा करुन रोजगार निति आयोग राज्यामधे लागू करावा. कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करावी आणि २००८ च्या अध्यादेशाप्रमाणे ८० टक्के स्थानिकाना नोकरी मिळावी असा आदेश कंपन्यांना द्यावा. महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या प्रोजेक्टला आळा घालावा आणि नविन रोजगार उत्पन्न कण्यासाठी उपाय योजना करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. वाढत्या बेरोजगारीवर लवकरात लवकर तोडगा काढवा आणि स्थानिक भुमीपुत्राना २००८ च्या अध्यादेशाप्रमाणे ८० टक्के रोजगार द्यावा अशी मागणी ह्यावेळी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.