महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. काल रात्री बारवी धरणातून ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरला पाणी पुरवठा करणारी १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी रात्री साडेदहाच्या सुमारास देसाई गावाजवळील शालू ढाब्याच्या समोर फुटली. यामुळं या भागात लाखो लिटर पाणी वाहून गेलं. या भागाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जलवाहिनी फुटल्याचं समजताच तात्काळ काटई नाक्यापासून पुढील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. यामुळं ठाणे, मुंब्रा, कळवा, वागळे औद्योगिक परिसर या भागाचा पाणी पुरवठा ठप्प झाला असून ही जलवाहिनी दुरूस्त झाल्यानंतरच हा पाणी पुरवठा सुरू होऊ शकणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महाम…