ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिल मंडळीही धास्तावली आहेत.सोमवारपासुन लॉकडाऊन शिथील केला असला तरी,सध्या न्यायालयीन कामकाज करण्यासारखी परिस्थिती नसल्याने 30 जूनपर्यत न्यायालयीन कामकाज एकाच सत्रात चालवावे.अशी विनंती ठाणे जिल्हा वकील संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात आली आहे.यासह इतर मागण्यांबाबतचा ठराव 7 जून रोजी पार पडलेल्या संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आला.या बैठकीला ठाणे,नवीमुंबई, वसई,भिवंडी,शहापूर, मुरबाड व कल्याण बारचे अध्यक्ष,पदाधिकारी व वकीलमंडळी उपस्थित होती.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली. ठाणे जिल्हा वकील संघटनेत 4 हजार सदस्य असुन यातील सुमारे दिड हजार वकील ठाणे न्यायालयात उपस्थित असतात.सध्या कोरोनोच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात फक्त रिमांड,जामीनअर्ज व अतिमहत्त्वाचे कामकाज सुरु आहे.न्यायाधीशमंडळींसह वकील व न्यायालयाचा स्टाफ या कठीण काळातही सेवा देत आहेत.मात्र,ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने न्यायालयात होणारी गर्दी पाहता दैनंदीन कामकाज चालवण्यासाठी वकिलांच्या सुचनेनुसार नविन मानक कार्यप्रणाली तयार करावी. न्यायालयातील बार रुम उघडावेत.तसेच,30 जूनपर्यत न्यायालयीन कामकाज सकाळी 10:30 ते 1:30. असे तीन तास एकाच सत्रात चालवावे.अशी विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.