जिल्ह्यात आज कोरोनाचे ४८९ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४८९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ७२० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १०१ नवे रूग्ण सापडले तर ३ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार १५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १०६ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ५९५ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १३३ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज २७ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३३९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ७ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५०७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १० नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५१७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३४७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ७० नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading