महानगरपालिकेच्या वतीने खारेगाव रेतीबंदर भागात स्मशानभूमीच्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आयुक्तांना स्थानिकांच्या विरोधापुढे झुकावे लागल्याचा प्रकार पाहायला मिळाला.
इतर नगरसेवकांच्या समोर झालेल्या स्थानिकांच्या विरोधातनंतर आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार आव्हाड यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची जागा बदलावी लागली.ठाण्यातील अनेकांच्या विरोधाला न जुमानता कोणत्याही दबावाला भीक न घालणाऱ्या संजीव जयस्वाल यांना रेतीबंदर भागातील स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन स्थानिकांच्या विरोधामुळे करता आले नाही. मग त्यांनीही विषय संपवण्यासाठी भूमिपूजन दुसऱ्या ठिकाणी केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी आव्हाडांनाही चार गोश्टी सुनावल्याचे चित्र पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी स्मशानभूमी उभारली जाणार आहे. त्याठिकाणी खेळाचे मैदान आहे. त्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे आव्हाडांसह जयस्वाल यांना भूमिपूजनाची जागा बदलावी लागली आहे. यामुळे हा प्रकार ठाण्यात चर्चेचा विषय झाला आहे.