राम मंदिराचा विषय हा ॲपेक्स कोर्टात असल्यामुळं संसद याप्रकरणी कोणताही ठराव मंजूर करू शकत नाही असं उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये माळी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी काही संस्थांकडून होत आहे. मात्र लोकशाहीमध्ये प्रकरण न्यायालयात असताना असं करणं योग्य नाही. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत सर्वांनी संयम बाळगावा असं आवाहनही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केलं.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/12/keshav-prasad-maurya.jpg)