महापालिकेची परवानगी न घेता पावसाळ्यापूर्वी उभारण्यात आलेल्या वेदरशेड तात्काळ काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या वेदरशेड न काढल्यास प्रतिमहा ५ हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. आज एका आढावा बैठकीत पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. महापालिकेची परवानगी न घेता पावसाळ्यापूर्वी ज्या वेदरशेडस् उभारण्यात आल्या आहेत त्या वेदरशेडस् पावसाळा संपल्यानंतरही काढण्यात आलेल्या नाहीत. त्या तात्काळ काढाव्यात तसंच वेदरशेडस् काढण्यापूर्वी संबंधितांकडून मूळ रक्कम ५ हजार रूपये आणि दंड ५ हजार रूपये असे १० हजार रूपये वसूल करावेत असे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. सूचना देऊनही वेदरशेडस् न काढल्यास त्या महापालिकेच्या वतीनं काढाव्यात आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा असेही आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ज्यांनी परवानगी घेऊन तात्पुरत्या वेदरशेडस् उभारल्या आहेत त्यांनीही आपल्या शेडस् तात्काळ काढाव्यात असे पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/11/WhatsApp-Image-2018-11-26-at-3.02.19-PM-1.jpeg)