पिसे येथील उदंचन केंद्र बंद पडल्यामुळे
ठाण्यातील काही भागात 50 टक्के पाणी कपात
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होवून संपूर्ण उदंचन केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठयामध्ये 50 टक्के कपात लागू केली आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणीही सोमवारपासून (26.02.2024) पुढील सूचना मिळेपर्यत 50 टक्के पाणी कपात लागू केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात लुईसवाडी विभाग – (हाजुरी, लुईसवाडी, साईनाथ नगर, काजुवाडी, रामचंद्र नं 1, रघुनाथ नगर, अंबिका नगर), कोपरी विभाग – (कोपरी, धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ परिसर, आनंदनगर), नौपाडा विभाग - (गावदेवी जलकुंभ, टेकडी बंगला परिसर,) या ठिकाणी 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. सदर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.