ज्येष्ठ माणसांमुळेच संस्कृती टिकून असते – अशोक बागवे

नमस्कार बरोबरीच्या लोकांना करतात पण वंदन ज्येष्ठांनाच करतात. अशा वंदनीय मंडळींचा हा सोहळा आहे. अशा ज्येष्ठ माणसांमुळेच संस्कृती टिकून असते असं प्रतिपादन साहित्यिक अशोक बागवे यांनी केलं. व्यास क्रिएशन्सच्या १९व्या ज्येष्ठ महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठांना सेवारत्न आणि ज्येष्ठरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यंदाचा कृतार्थ जीवन पुरस्कार ज्येष्ठ समिक्षक श्रीराम बोरकर यांना प्रदान करण्यात आला. संस्कृतच्या अध्यापिका असलेल्या ९२ वर्षाच्या लिलाताई श्रोत्री यांना विशेष सेवारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading