स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी 28 जिल्ह्यात मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. या मेमरी क्लिनिकमध्ये आत्तापर्यंत बावीसशे रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 300 रुग्णांवर स्मृतिभ्रंशाचे उपचार सुरू असल्याचे माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेमरी क्लिनिक सुरू करून स्मृतिभ्रंशाविषयी अर्ली डिटेक्शन सेंटर सुरू झाली आहे. या केंद्राद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीच्या विविध चाचण्या घेऊन तपासणी केली जाते. या तपासणीचे अवलोकन करून नंतर रुग्णांवर औषधोपचार केला जातात. यांच्या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन औषध उपचार केले जातात. स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यायची याविषयी त्यांच्या नातेवाईकांनाही प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/09/eknath-shinde.jpg)