राज्य शासनानं राज्यातील हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कमला मिल प्रकरणानंतर जाग्या झालेल्या शासनानं वर्षभरातच हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश काढले आहेत. कमला मिल प्रकरणात १४ जणांचा मृत्यू झाला होता. हुक्का पार्लर बंद करण्यासाठी एप्रिल महिन्यात कायदा करण्यात आला होता. तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. राज्यपालांनी या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर शासनानं हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. या बंदीची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/hookah-parlour.jpg)