पाणीपुरवठा विभागाची पाणीपट्टीची उद्दिष्टाचा 76 टक्के इतकी वसुली

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टीची वसुली उद्दिष्टाच्या जवळपास 76 टक्के इतकी केली आहे. पाणीपुरवठा विभागाला 135 कोटी
रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 103 कोटींची वसुली झाली आहे. घरगुती ग्राहकांकडून 90 कोटी
व्यवसायिक ग्राहकांकडून दहा कोटी तरी तर ग्राहकांकडून अडीच कोटी अशी वसुली झाली आहे. पाणीपट्टी वसुली मध्ये माजीवाडा प्रभाग समिती
अव्वल ठरली असून या ठिकाणी साडेबारा कोटीहून अधिक पाणीपट्टीची वसुली झाली आहे. वर्तक नगर मधून 12 कोटी, नौपाड्यात्नतून जवळपास
नऊ कोटी, तर उथळसरमधून साडेआठ कोटी, चितळसर मानपाडा यातून पावणेसात कोटी, लोकमान्य नगर मधून आठ कोटी, वागळे इस्टेट मधून
पावणे आठ कोटी कळव्यातून साडेचार कोटी, विटाव्यातून दोन कोटी. खारेगाव मधून पावणेचार कोटी वसुली झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading