जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित झाला नसला तरी संभाव्य चारा टंचाई विचारात घेता जलाशय आणि तलावाखालील जमिनीत चारा पीकं घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत. जलसंपदा, मृद आणि जलसंधारण विभागाकडील जलाशयातील गाळ पेरा जमीन शेतक-यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी रूपया १ इतक्या नाममात्र दरानं भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय झाला आहे. या जमिनीमध्ये जनावरांसाठी सुयोग्य अशी वैरण आणि मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पीकं घेण्याकरिता पशुसंवर्धन विभागातर्फे चारा बियाणं विनामूल्य दिलं जाणार आहे. हा चारा शेतक-यांना स्वत:च्या जनावरांसाठी उपयोगात आणता येईल आणि अतिरिक्त चारा परिसरातील दुग्ध उत्पादक शेतक-यांना देता येईल. यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा तालुका पशुसंवर्धन विभागात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून हे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/12/WhatsApp-Image-2018-12-06-at-3.26.51-PM.jpeg)