एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेवून आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील राजकीय स्वरूपाचे सर्व बँनर्स आणि जैहिरात फलक तात्काळ काढण्याचे आदेशही त्यांनी दिले. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागासाठी ११, १८ , २३ आणि २९ एप्रिल अशा ४ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून लोकसभेच्या घोषणेमुळे राज्यात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मतमोजणी पूर्ण होवून निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. या आचारसंहितेचे पालिका क्षेत्रात काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त अहिवर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. आदर्श आचारसंहितेच्याधर्तीवर ठाणे शहरात लावण्यात आलेले सर्व प्रकारचे राजकीय स्वरूपाचे बॅनर, होर्डिंग काढण्यात यावेत असेही अहिवर यांनी सूचित केले आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/tmc-building.jpg)