स्थानिक भूमिपुत्रांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आगरी सेनेच्या वतीनं उद्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड नाका येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पालघर जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना तृतीय श्रेणी अथवा चतुर्थ श्रेणीमध्ये नोक-या देणे, ओएनजीसी सर्वेक्षणासाठी बंद करण्यात आलेल्या मासेमारीची नुकसान भरपाई देणे, वसई-विरार महापालिकेनं मालमत्ता केलेली वाढ रद्द करावी, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा महामार्ग आणि विरार-अलिबाग कॅरीडॉर या प्रकल्पातील बाधित शेतक-यांना योग्य मोबदला मिळावा या आणि अशा काही मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/02/6-aagri-sena.jpg)