सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे आणि त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादींवर कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू
युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ आहे.
उचाट शिक्षण संस्थेच्या दीन गायकर आणि शुभम पाटील यांनी 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये पटकावले सुवर्णपदक
उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी चिल्ड्रन अकादमी शाळेतील विद्यार्थी दीन गायकर आणि शुभम पाटील यांनी गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
जेष्ट पत्रकार बबन कांबळे यांच आज अल्पशा आजारान निधन
ठाण्यातील जेष्ट पत्रकार बबन कांबळे यांच आज अल्पशा आजारान निधन झालं.
बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाला.
महापुरषांच्या नावाचा उल्लेख प्रथम करावा ठाण्यातील एक सामाजीक कार्यकर्ते राजीव दत्ता यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महापुरषांच्या नावाचा उल्लेख प्रथम करावा अशी मागणी ठाण्यातील एक सामाजीक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालयाची सुवीधा
एखादा व्यक्ती आजारी पडला तर रुग्णांसहीत नातेवाईकांची तारांबळ उडते. मानसिक ताणतणाव वाढतो, अशावेळी रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून आयुक्त अभिजीत बांगर यांनी नव्या मित्राची साथसंगत देण्याची योजना आखली आहे.
धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३३ किलोमीटरचे अंतर भर थंडीत पोहून ठाण्यातील जलतरण पटुंनी केले पार
धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३३ किलोमीटरचे अंतर भर थंडीत पोहून ठाण्यातील जलतरण पटुंनी पार केले.
मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर बनवावीत-मुख्यमंत्र्यांच बांधकाम व्यवसायीकांना आवाहन
प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर ही बनवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एमसीएचआय- क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्यावतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या ( प्रॉपर्टी) प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोवीड काळात … Read more
स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सयाजी गायकवाडांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही-प्रा. बाबा भांड
महाराजा सयाजीराव हे प्रज्ञावंत राजे होते, त्यांनी समाजसुधारणा, दुष्काळ निवारण, शिक्षण इ. क्षेत्रामध्ये कालातीत कायदे केले. त्यांनी अनेक महापुरूषांना, स्वातंत्र्यसेनानींना मदत केली. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास पुर्ण होवू शकणार नाही असे प्रतिपादन करीत महाराष्ट्र सरकार सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ग्रंथ स्वरुपात प्रकाशित करून त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आणते आहे याचे मनस्वी समाधान वाटते असे वक्तव्य ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक बाबा भांड यांनी ठाण्यात केले.