नारळी पौर्णिमा पारंपरिक पध्दतीने साजरी

ठाण्यातील कोळी बांधवांनी कळवा येथील खाडीकिनारी जाऊन समुद्राला नारळ अर्पण करून पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी केली. कोळी बांधवांनी खाडीकिनारी जाऊन सागराविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Read more

उद्याचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी चांगला – दा. कृ. सोमण

उद्या रक्षाबंधन असून उद्याचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी चांगला आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

कोरोनाच्या निर्बंधांमुळे श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकराचं बंद दाराआडून दर्शन घेण्याची भाविकांवर वेळ

श्रावणातला आज पहिला सोमवार. भक्तीभरल्या पवित्र अशा श्रावण महिन्यात व्रतवैकल्यांची रेलचेल असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा श्रावणातला भक्तीरस भाविकांना मंदिरापर्यंत पोहचवता येत नाही ही खंत आहे.

Read more

कोरोना निर्बंधांमुळे अंगारकी चतुर्थीलाही गणेश भक्तांना बंद दाराआडूनच घ्यावं लागलं श्रीगणेशाचं दर्शन

गेल्या काही अंगारकी चतुर्थीप्रमाणेच आजच्या अंगारकी चतुर्थीलाही कोरोना निर्बंधांमुळे गणेश भक्तांना श्रीगणेशाचं बंद दाराआडूनच दर्शन घ्यावं लागलं.

Read more

ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत स्त्रियांनी वडाची पूजा करून केलं साजरं

ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत अनेक स्त्रियांनी वडाची पूजा करून साजरं केलं.

Read more

महागिरीतील एका कुटुंबानं ईदचा नमाज घरी अदा करून निर्माण केला आदर्श

एकीकडे ईदमुळे निर्माण होणा-या गर्दीबाबत चिंता निर्माण होत असतानाच दुसरीकडे महागिरीतील एका कुटुंबानं ईदचा नमाज घरी अदा करून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

Read more

कोरोना रोखण्यासाठी भाविकांचे संकटमोचकाला साकडे – ठाण्यात पहाटेच पार पडला हनुमान जन्मोत्सव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पिडा ईश्वरालाही सोसावी लागत असुन सण-उत्सवांवर सरकारने निर्बंध लादुन मंदिरेही टाळेबंद ठेवली आहेत.असे असले तरी,कोरोनाचा समुळ नायनाट व्हावा यासाठी मंगळवारी हनुमान जयंतीदिनी भाविकांनी संकटमोचकाला साकडे घातले.
ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्यावतीने कोपरीतील हनुमान मंदिरात पहाटेच्या सुमारास कोविड नियमांचे पालन करीत पुरोहीत महेश देवधर यांच्याकरवी यथासांग पुजा-अर्चा करून साधेपणाने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भाविकांनीही सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर,दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढु लागल्याने राज्य शासनाने साथ प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.सर्व धार्मिक- सामाजिक उत्सवांवर निर्बंध घालुन दैनंदिन पूजाअर्चा वगळता मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.या पार्श्वभूमीवर केवळ परंपरेचे जतन व्हावे यासाठी भल्या पहाटेच ठाणे पूर्वेतील पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने पार पडला.यावेळी,मंदिर व्यवस्थापनाने मंदिर सजावटीसह परिसरात साफसफाई आणि जंतुनाशक फवारणी करून सामाजिक बांधिलकी जपली.तर, भाविकांनीही कोविड नियमावलीचे पालन करीत कोरोनाच्या भयानक साथीचे संकट लवकर टळु दे,असे साकडे संकटमोचक हनुमानाच्या चरणी घातले.पहाटे पुजाअर्चा पार पाडल्यानंतर दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात आले होते.

Read more