खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला.
Govt
केंद्र सरकारच्या ऑथेन्टीकेशन अॅपमुळे निवृत्ती धारकांना दिलासा
केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी फेस ऑथेंटिकेशन अॅप्लिकेशनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एक मोबाइल अॅप लाँच केले आहे,
महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांची बदली
राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्याचं सांगितलं जातं. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना अभियानात कल्याण तालुका तर राज्य पुरस्कृत योजनांमध्ये अंबरनाथ तालुका प्रथम
उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केला जिल्ह्याचा दौरा
ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करत अभियानातर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कोकण विभागातून ५३५ प्रस्ताव
असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना वित्तपुरवठा करून संघटित क्षेत्रात आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कोकण विभागातून ऑनलाईन प्रणालीद्वारे कृषि आयुक्तालयास ५३५ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील धरणांचा वॉटरग्रीड करण्यासंदर्भात विचार करावा – संजीव जयस्वाल
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील धरणांचा वॉटर ग्रीड करता येईल का, याचा विचार करावा. तसेच 2050 पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिले.
जलशक्ती मंत्रालयातर्फे ‘स्वच्छता लघुपट’ स्पर्धेचे आयोजन
ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाआवास अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करा- पालकमंत्री
प्रत्येकाला हक्काचा निवारा हवा असतो. पक्क्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली महाआवास ग्रामीण अभियानाची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करून गरीब कुटुंबाच्या घराचे स्वप्न साकार करा असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जिल्ह्याच्या ४७७ कोटी रूपयांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी
2021-22 या अर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 477 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.