ठाणे पोलीस दलातील पोलीस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि अमरसिंह जाधव हे सत्ताधार्यांची प्रायव्हेट आर्मीसारखे काम करीत आहेत; त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे पोलीस आयुक्त जयजीतसिंग यांना आपला एन्काउंटर करण्याचे आदेश देतील आणि पोलीस आयुक्तही खुर्चीतून उठून आदेश पाळण्याची ग्वाही देतील असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. 22 डिसेंबर रोजी जयंत पाटील यांचे विधानसभेत निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले.
anand paranjape
राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा
राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारांशी तुलना सहन करणार नाही – आनंद परांजपे
छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारांशी तुलना सहन करणार नाही मंगलप्रभात लोढा यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे अशी आगपाखड राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावरील हल्ल्याशी राष्ट्रवादीचा सबंध नाही- आनंद परांजपे
मुंब्रा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीशी आमचा काहीही सबंध नाही. राष्ट्रवादी हा पक्ष संविधानावर निष्ठा असणारा पक्ष आहे, आम्ही असे कृत्य करीत नाही असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगाकडे का गेले होते? एकनाथ शिंदे यांना आनंद परांजपे यांचे आवाहन
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकसंख्येच्या आधारावर न्याय आणि समानतेच्या आधारावर प्रभाग रचना व्हावी, यासाठी पत्र दिले होते. मात्र, प्रभाग आराखडा जाहीर होण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारी रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोन खासदार, आमदार, महापौर आणि काही नगरसेवकांना घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात कशासाठी गेले होते; ते निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासाठी गेले होते का, याचे स्पष्टीकरण पालकमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे.
हिमंत असेल तर महापालिकेने सादर केलेला सुरुवातीचा नकाशा सादर करा – आनंद परांजपेंनी दिले आव्हान
ठाणे महापालिकेचा प्रभाग आराखडा कळवा, मुंब्रा, कौसा, शिळ आणि दिवा या भागांना अधिकच्या जागा देण्यात आल्याची आवई उठविण्यात आली आहे. अशी आवई उठविणार्यांनी दुसर्याच्या ताटात किती पडले आहे, हे पाहण्यापेक्षा स्वत:च्या ताटात किती पडले आहे, हे पाहिले तर बरे होईल. दुसर्याला काही मिळूच नये, ही कोत्या मनोवृत्तीची भूमिका कशासाठी? निवडणूक आयोगाच्या या गणितीय आकडेवारीत काय चुकीचे आहे? हे दाखवून द्यावे; आणि हिमंत असेल तर पहिला नकाशा जो निवडणूक आयोगाला सादर केला आहे. तो शहराला दाखवा, जेणेकरुन दूध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असे आव्हान गणितीय आकडेवारीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.
आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचे हजेरी बुक सांभाळावे शिवसेना नगरसेवकांचा टोला
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू असून त्यांना पिंक बुक बघण्याचा सल्ला देण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आनंद परांजपे यांना जे हजेरी पुस्तक देऊन पदावर बसवले आहे, ते त्यांनी सांभाळावे, असा जबरदस्त टोला शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांनी लगावला.
मिशन कळवा राबवलं तर कमिशन टीएमसी मिशन राबवण्याचा राष्ट्रवादीचा इशारा
मिशन कळव्याची भाषा करणार्यांनी ध्यानात ठेवावे की आम्ही जर कमिशन टीएमसी उघडकीस आणले तर ठाणेकरांना तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.
महापालिकेच्या लसीकरण महोत्सवात सेनेचे श्रेय – राष्ट्रवादीचा महापौरांना जाब
कळवा-खारीगाव येथे आयोजित केलेल्या महालसीकरण शिबिराचे श्रेय घेण्याच्या नादात महापौर नरेश म्हस्के यांनी लसीकरणासाठी लागणारा दहा लाखांच्या खर्चाचा भार आम्ही उचलला होता अशी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीमुळेच नरेश म्हस्के ठाण्याचे बिनविरोध महापौर झाल्याचा त्यांना विसर – आनंद परांजपेंचा टोला
नरेश म्हस्के हे ठाण्याचे बिनविरोध महापौर राष्ट्रवादीमुळेच झाले आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे.