कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सार्जनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केटस् निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा प्रभाग स्तरावर तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.
corona
शहरातील काही भागातील औषध फवारणी ठप्प झाल्याचा नारायण पवार यांचा आरोप
कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची भीती असतानाच ठाणे शहरातील काही भागात औषध फवारणी ठप्प झाली आहे.
दूध पुरवठा सुरळीत असल्यानं दूधासाठी धावपळ न करण्याचं शहर दूध विक्रेता संघटनेचं आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं काही निर्बंध जारी केले असले तरी शहराला होणारा दूध पुरवठा योग्यरितीनं सुरू आहे तरी ग्राहकांनी दूधासाठी धावपळ करू नये असं आवाहन ठाणे शहर दूध विक्रेता संघटनेनं केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीला आळा घालण्याकरिता कोकण विभागीय आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई केली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश – अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे पोलीसांचे आदेश
ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची खरेदी करण्याव्यतिरिक्त लोकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.
वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची टीसाची मागणी
वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी टीसा म्हणजे ठाणे लघुउद्योजक संघटनेनं उर्जामंत्र्यांकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टाळ्या वाजवण्याच्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणा-या शासकीय सेवेतील कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवण्याच्या केलेल्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला.
ठाण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा ३१ मार्च पर्यंत बंद
ठाण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी बंद पाळल्यामुळं ३१ मार्च पर्यंत वृत्तपत्रं वाचावयास मिळणार नाहीत.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील पेट्रोल पंप आता १२ तासच खुले राहणार
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील पेट्रोल पंप आता १२ तासच खुले राहणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.