जिल्ह्यात आज कोरोनाचे १७३ नवीन रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला.
corona virus
जिल्ह्यात आज कोरोनाचे १६२ नवीन रूग्ण
सध्या कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत असून जिल्ह्यात आज कोरोनाचे १६२ नवीन रूग्ण आढळले.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील पायाभुत सुविधा – आरोग्य विभाग सज्ज
राज्यात कोविड रुग्णवाढीचा वेग वाढलेला असून जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यात करोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील ग्रामीण पाच तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे कोविड रुग्णांकरिता आयसोलेशन बेडसह वार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे.
‘चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य’- महापालिका आयुक्त
कोरोनाविरोधी लढ्यात आपण थोडेही गाफील राहून चालणार नाही. नागरिक, खाजगी डॉक्टर या सगळ्यांना त्यांचे गांभीर्य पटवून देण्यात महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची आणि तेथील वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात अजिबात हयगय होऊ नये अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविड आणि इन्फ्लुएंझा साथीचा प्रतिबंध तसंच बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे : महापालिका आयुक्त
सद्यस्थितीत कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा प्रतिबंध व्हावा आणि बाधित रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेची आरोग्ययंत्रणा सज्ज झाली आहे. कोविडबाधित रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष, बेडस्, गरज पडल्यास ऑक्सिजन यंत्रणा, डॉक्टर्स, परिचारिका, औषधे यांची कोणतीही कमतरता भासणार नाही या दृष्टीने आरोग्य विभागाने सतर्क रहावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठ, रेल्वे स्टेशन या गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.