आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत.
रंगवल्ली परिवाराने साकारले “रंग रामायण” रांगोळी प्रदर्शन
हरवलेले रामायण पुन्हा कलावंताच्या चिमटीतुन उमटले आहे. कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातुन घडेल.असे प्रतिपादन ठाण्याचे आतंरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केले.
कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त भगवा तलाव येथे श्रीरामाची आरती संपन्न
कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त शेणाळे तलाव परिसरात आयोजित प्रभू श्रीरामांच्या महाआरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, कल्याण संस्कृती मंच आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याणात तीन ठिकाणी या महाआरती घेण्यात आल्या. पांचजन्य ढोल ताशा पथकाकडून लयबद्ध वादन त्यानंतर मारुतीस्तोत्र, श्रीरामरक्षा पठण करून मग श्रीगणेश आणि श्रीरामांची आरती संपन्न झाली. … Read more
महायुतीला उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्यावं – राजन विचारेंचा टोला
महायुतीला ठाण्यासाठी उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्या असा टोला राजन विचारे यांनी आज नाव न घेता लगावला.
कल्याण लोकसभा मतदारसंघात अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर
अखेर ब-याच चर्चेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची वर्णी
ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची वर्णी लागली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली झाली आहे.
आमच्या दृष्टीकोनातून 400 पार कसं होईल हे महत्वाचे – खासदार राहुल शेवाळे
आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतील जागावाटप हा विषय महत्त्वाचा नाही आहे. आमच्या दृष्टीकोनातून 400 पार कसं होईल आणि महायुती महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा कशी जिंकेल हा विषय महत्वाचा असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.
जिल्ह्यामध्ये ६५ लाखाहून अधिक मतदार – पूर्णत: दिव्यांग संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून ठाणे जिल्ह्यामध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली आणि अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार आणि कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.