भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी राज्यभरात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते.
TMC
छत्रपती शिवाजी रुग्णालयातील फॉल सीलिंग चा तुकडा पडून रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी
छत्रपती शिवाजी रुग्णालयातील फॉल सीलिंग चा तुकडा पडून रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. छत्रपती शिवाजी रुग्णालय यां ना त्या कारणाने सतत प्रकाश झोतात आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील मृत्यूमुळे रुग्णालय चर्चेत आलं होतं. आता रुग्णालयातील फॉल्स सेलिंग चा तुकडा पडल्यामुळे कर्मचारी जखमी झाल्याने रुग्णालय पुन्हा चर्चेत आल आहे. काल रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडलापी … Read more
दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने
दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक भूसंपादन आणि जोड रस्ते यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
ठाण्यातील पुढील ३० वर्षांचं पाण्याचं नियोजन करणार पालिका आयुक्तांचं सुतोवाचं
भविष्यकाळातील ठाणे शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेवून पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिका सक्रिय असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ऐतिहासिक कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केली मंदिराची पाहणी
जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंदिराची पाहणी केली.
ठाणे महानगरपालिकेचा 41 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
एकापेक्षा एक बहारदार नृत्याविष्कार, मराठी- हिंदी गाण्यांची रेलचेल, नाटिका असे विविध कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी सादर करुन ठाणे महानगरपालिकेचा 41 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
सी पी तलाव येथील कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबली पाहिजे – अभिजीत बांगर
वागळे इस्टेट मधील सी पी तलाव येथील घनकचरा स्थलांतर केंद्रातून आसपासच्या परिसरात जाणवणारी कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबली पाहिजे, असा सक्त इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घनकचरा विभाग आणि कंत्राटदार यांना दिला आहे.
वाढत्या पार्किंग समस्येला आवर घालण्यासाठी मैदानं आणि उद्यानांच्या खाली भूमिगत वाहनतळ निर्माण करावेत – आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्रयांकडे मागणी
एम.एम.आर. क्षेत्रामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने पार्किंगबाबतचे एकच धोरण आखल्यास वाहतुक कोंडी दूर होईल आणि अपघाताला आळा बसेल.
सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी महापालिकेने करावी – केंद्रीय दक्षता समिती सदस्य रविंद्र प्रधान
केंद्र शासनाच्या समाजिक न्याय विभागातर्फे नियुक्त राष्ट्रीय दक्षता समितीचे सदस्य रविंद्र प्रधान यांनी ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार वसाहतीत अचानक भेट देवून सफाई कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
इंदिरानगर आणि आजुबाजुचा पाणीपुरवठा आज बंद
इंदिरानगरकडे पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज (गुरूवार) पहाटे चार वाजता ज्ञानेश्वर नगर नाका येथे फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी इंदिरानगरकडे येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, डवले नगर, रूपा देवीपाडा, लोकमान्य नगर, किसन नगर, भटवाडी इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा आज (गुरूवारी) बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.