ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर 2 येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.
कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून केली अटक
कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून अटक केली आहे हाझला खान आणि अनस शेख असे या आरोपीची नावे असून हत्येनंतर दोघेही फरार झाले होते. मात्र सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आहे.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना कार्यक्रमाची मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी
जिल्हयातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे आणि पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
पालिकेची येऊर मधील बंगल्यां वर कारवाई
ठाणे महापालिकेनं सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांबरोबरच आता बड्या मंडळींच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई सुरू केली आहे. ठाण्यात येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत हे उद्यान येत असल्यामुळे या ठिकाणी अनेक निर्बंध आहेत. तरीही ठाण्यातील अनेक बड्या मंडळींचे या भागात बंगले आहेत. अशा अनधिकृत बंगल्यांबाबत महापालिकेनं कारवाईही करण्याचा प्रयत्न केला पण तरीही हे बंगले … Read more
ठाणे वायुसेनास् टेशनमधील केंद्रीयविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका…..राजन विचारे
ठाण्यातील कोलशेत येथील वायुसेना स्टेशन मधील केंद्रीय विद्यालयाची तळमजला+तीन मजली असलेले इमारत सन 2017 मध्ये धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांचे पुनर्वसन तात्काळ करा तसेच नव्याने होत असलेल्या इमारतीचे काम गेले तीन वर्षापासून बंद पडलेले आहे त्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कार्यवाही करून काम सुरू करावे अशी मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी केली … Read more
नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण १००% भरले
यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण आज पहाटे शंभर टक्के भरले आहे.मोरबे धरणाची 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार झाल्याने पहाटे धरणाचे दोन्ही दरवाजे 15 सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहेत. ज्यामधून 675 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे.गणेशोत्सवात नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असून यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता पूर्णतः … Read more
महापालिकाक्षेत्रात १६८३० श्रीगणेशमूर्तींचे तसेच १००६ गौरीमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन
श्रीसह गौरी विसर्जनाच्या पाचव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १६८३० गणेश मूर्ती तसेच १००६ गौरी मूर्ती अशा एकूण १७८३६ मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात १७१ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे व … Read more
उल्हासनगर जवळील शहाड सेंचुरी रेऑन कंपनीत स्फोट;दोन जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी
उल्हासनगरच्या शहाड जवळील सेंचुरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.या प्रकरणी दोन जणांचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.स्थानिक पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास उल्हासनगर, मुरबाड हायवे जवळ, शहाड या ठिकाणी सेंचुरी रेयोन या कंपनीमध्ये MH ४६ BB ४९७५ या नायट्रोजन कंटेनरचा स्फोट झाला होता. सदर घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन … Read more
केंद्र सरकार धर्मद्वेष आणि जाती द्वेष पसरवत आहे- जितेंद्र आव्हाड
-केंद्रातील मोदी सरकार हे एखाद्या विशिष्ट धर्म व जाती विरोधात द्वेष पसरवत आहे.-भाजप चे दिल्ली मधील खासदर रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.-नव्या लोकसभेत सुरुवातीलाच भाजप ने अत्यंत चुकीचा पायंडा निर्माण केला आहे.-एखाद्या खासदार बाबत इतके वाईट विधान करूनही लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी कोणतीही करावाई केलेली नाही.
ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाईमित्रसुरक्षा शिबीर
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आरोग्य तपासणी आणि निरनिराळ्या सरकारी योजनांची माहिती देवून नोंदणी करून घेतली … Read more