एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकास शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्याची तसंच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन २ लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन
जिल्ह्यातील जमिनीच्या फेरफार नोंदी आता संगणकीकृत होत असून या ई-फेरफार नोंदीनुसार जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी येत्या 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.
कल्याणमध्ये 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी ठाणे ग्रंथोत्सवाचे आयोजन
ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च- तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील पारनाका येथील आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदिर येथे येत्या शनिवारी आणि रविवारी ठाणे ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 24 हजार 904 प्रकरणे निकाली
जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित 22 हजार 393 आणि 2 हजार 511 दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण 24 हजार 904 प्रकरणे सामंजस्याने तडजोड होऊन निकाली निघाली आहेत.
ठाणे महापालिकेची बेवारस गाड्या उचलण्याची कारवाई
ठाणे महापालिकेनं बेवारस गाड्या उचलण्याची कारवाई सुरू केली आहे.
डेब्रिज टाकणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी दक्षता पथक नेमण्याचे आयुक्तांचे आदेश
ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर डेब्रिज टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याने शहराच्या सौंदर्यीकरणास बाधा येत आहे. त्यामुळे डेब्रिज टाकणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी दक्षता पथक नेमण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार
प्रदुषणासारख्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत असून नद्यांमधील गाळामुळे त्यांची वहन क्षमता कमी होत आहे. याबाबींचा विचार करून नदीला जाणून घेण्यासाठी तसेच समस्यांचा अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर
विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
श्रीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची मागणी
श्रीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस लाठीमाराची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.