एकापेक्षा एक बहारदार नृत्याविष्कार, मराठी- हिंदी गाण्यांची रेलचेल, नाटिका असे विविध कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी सादर करुन ठाणे महानगरपालिकेचा 41 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
सी पी तलाव येथील कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबली पाहिजे – अभिजीत बांगर
वागळे इस्टेट मधील सी पी तलाव येथील घनकचरा स्थलांतर केंद्रातून आसपासच्या परिसरात जाणवणारी कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबली पाहिजे, असा सक्त इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घनकचरा विभाग आणि कंत्राटदार यांना दिला आहे.
ढोलकीपटू तेजस मोरे याच्या रिदम म्युझिक अकॅडमीचे उदघाटन मुंबई विद्यापीठाच्या शैला खांडगे यांच्या हस्ते
ठाणे शहरातील पाचपांखाडी भागात ठाण्यातील सुप्रसिद्ध ढोलकीपटू तेजस मोरे याच्या रिदम म्युझिक अकॅडमीचे उदघाटन मुंबई विद्यापीठाच्या शैला खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी घेतल ताब्यात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल.
नथुराम गोडसे बोलतोय” नाटकाचा प्रयोग गडकरी रंगायतनमध्ये प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत निर्विघ्न पार
धर्मवीर आनंद दिघे विचार आणि सेवा मंच तर्फे ठाण्यात आयोजित केलेला “नथुराम गोडसे बोलतोय” नाटकाचा प्रयोग गडकरी रंगायतनमध्ये प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत निर्विघ्न पार पडला.
काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी वाहनांची त्वरित टोलमुक्ती करावी – आनंद परांजपे
काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी वाहनांची त्वरित टोलमुक्ती करुन महायुती सरकारने ठाणेकर जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर आणि ठाणे समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.
टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार – राज ठाकरे
टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरेंनी ठाण्यात येऊन अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा – मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट
वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला.
ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक परिपूर्ण होईल
ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन सुधारित आराखडा तयार करणे, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, ही एक अत्यंत चांगली सुरुवात आहे.
राज्य सांस्कृतिक धोरण अंतिम अहवाल लवकरच
राज्य सांस्कृतिक धोरणाच्या फेर आढाव्यासाठी नियुक्त केलेल्या, समित्यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेले असून; त्याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येईल, असे राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.