BJP
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता आणि अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वीज वितरण सेवा सुदृढ करणार – संजय केळकर
वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत असून त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली.
गौरी-गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकण रेल्वेची विशेष गाडी सोडण्याची संजय केळकरांची मागणी
गणेशोत्सवासाठी २९ ऑगस्ट रोजी दिवा ते सावंतवाडी विशेष गणपती स्पेशल जादा गाडी सोडण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
भाजप राज्यपालांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही – आशिष शेलार
राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्ष अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.
रेल्वे स्थानक स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम
ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागाचे फेरीवाल्यांनी चक्क गोदामात रुपांतर केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
घोडबंदर तसंच अन्य भागासाठी ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी
बारवी धरणातून घोडबंदर तसेच अन्य भागासाठी ५० दशलक्ष लिटर पाणी मिळावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी करण्याची निरंजन डावखरेंची मागणी
काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
बारवी धरण प्रकल्पग्रस्तातील सर्वांना १५ ऑगस्टपासून नोकरीत सामावून घेण्याचे कपिल पाटलांचे आदेश
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या मुहूर्तावर १५ ऑगस्ट रोजी बारवी धरणातील सर्वच्या सर्व ४१८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे, असे आदेश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले आहेत.
मुरबाड रेल्वेसाठी वेगवान निर्णय – केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देणारे पत्र राज्य सरकारने आज तत्काळ रेल्वे बोर्डाला पाठविले.