ठाणे ग्रामीण पोलीस दलाकडून साडे अकरा लाखांचा दंड वसूल

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी दिलेली वाहने सोडून विनाकारण रस्त्यावर फिरणारे3085 वाहनचालकावर मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करून 11,46,800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 संचारबंदीचे उलंघन केल्या प्रकरणी  एकुण 317 आरोपी विरुद्ध 172  गुन्हेदाखल करण्यात आले असून  26 वाहने जप्त करण्यात  आलेली आहेत.

 जेष्ठ नागरीकाचे देखभालीसाठी 55 जेष्ठ नागरीकाशी संपर्क साधुन त्यांच्याअडचणी असल्यास ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सबंधीत पोलीस स्टेशनचे जेष्ठनागरीक व्हाट्सअ अॅप वर संपर्क साधुन मदत मागन्या बाबत कळविले आहे.

 तरी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा कायदेशीरकारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading