मुंबई महापालिकेनं ज्याप्रमाणे उद्यानं बंद केली त्याप्रमाणे ठाणे महापालिकेच्या सर्व उद्यानांमधील प्रवेशावर बंदी आणली आहे. यामुळं रोज सकाळी जाणा-यांना त्यापासून वंचित रहावं लागलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राणीच्या बागेपासून सर्व बागबगिचे, उद्यानं बंद करण्यात आली आहेत. त्याप्रमाणेच ठाणे महापालिकेनंही सर्व उद्यानं बंद केली आहेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला जाणा-या ठाणेकरांना उद्यानांना टाळं लागल्याचं चित्र पहायला मिळालं. उद्यानं बंद करण्यात आल्यामुळं ठाणेकर रोज सकाळच्या फिरायला जाण्याच्या नियमापासून वंचित राहिले आहेत. आज ठाणे महापालिकेची बहुतांश उद्यानं टाळं लावून बंद करण्यात आली होती.