कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांचं रूपांतर नगर परिषदेत करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करू असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गणेश नाईक आणि गणपत गायकवाड यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. या २७ गावासंदर्भातील हरकती आणि सूचना घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. विभागीय आयुक्तांचा हा अहवाल मिळाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबरही एका बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.