आरटीई प्रवेश प्रक्रिया ११ ते २९ फेब्रुवारी दरम्यान राबवली जाणार

आरटीई प्रवेश प्रक्रिया ११ ते २९ फेब्रुवारी दरम्यान राबवली जाणार आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी ही माहिती दिली आहे. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेचं शिक्षण विनामूल्य मिळावं यासाठी शासनाच्या वतीनं या घटकातील बालकांसाठी पहिलीच्या मंजूर जागांच्या २५ टक्के प्रवेशासाठी त्या त्या शाळांच्या स्तरावर राखीव जागा ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाकरिता २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनं राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील ६ महापालिका आणि ५ तालुक्यात ही प्रवेश प्रक्रिया ११ ते २९ फेब्रुवारी पर्यंत राबवली जाणार आहे. rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मदतीनं अर्ज भरताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून मदत केंद्र देखील सुरू केली जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading